---Advertisement---

मंदिरातून चोरीला गेलेले दीड लाख रुपये परत; चोरट्यांचा पश्चात्ताप, समाजात चर्चेचा विषय

On: September 8, 2025 5:23 AM
Follow Us:
---Advertisement---

हैदराबाद :
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील बुक्करायसमुद्रम या गावातील मुसलम्मा मंदिरात सुमारे महिनाभरापूर्वी चोरी झाली होती. मंदिराच्या हुंडीत भाविकांनी अर्पण केलेली रोख रक्कम आणि काही मौल्यवान वस्तू अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशीही सुरू झाली, मात्र गुन्हेगारांचा थांगपत्ता लागत नव्हता.

मात्र, या चोरीनंतर नेमकं एका महिन्यानंतर घडलेल्या घटनाक्रमाने सर्वांना आश्चर्यचकित केले. चोरीला गेलेले पैसे पुन्हा त्याच मंदिरात परत आले आणि त्यासोबत चोरट्यांची कबुली असलेली एक चिठ्ठी देखील ठेवण्यात आली होती.

मंदिरात अचानक आढळले नोटांचे गठ्ठे

गेल्या गुरुवारी मंदिर व्यवस्थापनाला मंदिरात एका चादरीत बांधलेले नोटांचे गठ्ठे सापडले. मंदिराचे पुजारी आणि कर्मचारी सुरुवातीला काही क्षण स्तब्धच झाले. ही चादर उघडून पाहिली असता त्यामध्ये तब्बल १.८० लाख रुपयांची रोख रक्कम होती. पैशांसोबत एक लहानशी चिठ्ठी ठेवण्यात आली होती. या चिठ्ठीतून चोरांनी आपली चूक मान्य करत, चोरीनंतर त्यांच्या आयुष्यात आलेल्या संकटांचा उल्लेख केला होता.

दैवी शिक्षेची भीती

त्या पत्रात लिहिले होते की, “मंदिराच्या हुंडीतून पैसे चोरल्यानंतर आमच्या मुलांची तब्येत अचानक बिघडली. कितीही उपचार केले तरी काहीही उपयोग झाला नाही. आम्हाला हे सर्व देवाचा कोप आणि दैवी शिक्षा असल्यासारखे वाटले.” या धक्कादायक अनुभवामुळे चोरट्यांना आपल्या पापाची जाणीव झाली आणि त्यांनी चोरलेले पैसे परत करून दिले.

मंदिरात परत आलेल्या या पैशांमुळे केवळ प्रशासनच नव्हे तर गावकरी आणि भाविकसुद्धा अवाक झाले. आता हे प्रकरण स्थानिक पातळीवर दैवी चमत्कार म्हणून चर्चेत आहे.

याआधीही अशाच घटना

अशा प्रकारे चोरी करून नंतर पश्चात्तापाने वस्तू परत करण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

लखनऊ प्रकरण : काही महिन्यांपूर्वी लखनऊतील एका मंदिरातून शंभर वर्षे जुनी अष्टधातूची राधा-कृष्ण मूर्ती चोरीला गेली होती. मात्र, मूर्ती चोरीनंतर चोराच्या जीवनात अनेक अपघात व त्रास सुरू झाले. भीषण स्वप्नं पडू लागली, मुलांची तब्येत खालावली. शेवटी भयभीत झालेल्या त्या चोराने मूर्ती महामार्गाच्या कडेला ठेवली आणि त्यासोबत एक माफीनामा लिहून ठेवला.

तमिळनाडूतील मणिकंदन यांचे घर : नामवंत चित्रपट दिग्दर्शक एम. मणिकंदन यांच्या घरात देखील चोरी झाली होती. त्यात सुमारे एक लाख रुपये आणि दोन राष्ट्रीय पुरस्कारांची पदके लंपास झाली. पण काही दिवसांनी चोरट्यांनी पुन्हा ती पदके घरासमोरच्या पिशवीत ठेवली आणि सोबत माफीनामाही ठेवला. त्यामध्ये त्यांनी “तुमच्या कष्टाचं फळ आम्ही परत करतो, आमची चूक माफ करा” असे लिहिले होते.

चोरी नंतरचा माफीनामा

बुक्करायसमुद्रम प्रकरणातही मिळालेल्या पत्रात चोरांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले की, त्यांना आपल्या चुकीचा खोलवर पश्चात्ताप झाला आहे. मुलांच्या आजारपणाला त्यांनी चोरीचा परिणाम मानले आणि त्यामुळे चोरलेली रक्कम मंदिरात परत आणली.

यामुळे केवळ पोलिसांचाच नव्हे तर समाजाचाही गोंधळ उडाला आहे. साधारणपणे चोरून नेलेले पैसे परत करणे ही दुर्मीळ बाब मानली जाते. यामुळे गावकऱ्यांमध्ये आता ही घटना दैवी न्याय आणि चमत्कार म्हणून गाजत आहे.

पोलिसांची भूमिका

स्थानिक पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. जरी पैसे मंदिरात परत आले असले तरी हा गुन्हा बंद होत नाही. पोलिसांनी सांगितले की, चोरी झाली तेव्हा गुन्हा दाखल झाला असल्याने पुढील कायदेशीर चौकशी सुरूच राहील. मात्र, पैशांसोबत मिळालेल्या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

समाजातील चर्चा

या घटनेमुळे धार्मिक आस्था, अपराध आणि पश्चात्ताप याबाबत समाजात चर्चा सुरू झाली आहे. देवस्थानातील दान हे लोकांच्या श्रद्धेने अर्पण केलेले असल्याने त्याला हात घालणं हे मोठं पाप मानलं जातं. याच कारणामुळे चोरांनी आपली चूक मान्य करून पैसे परत केल्याचं मानलं जात आहे.

बुक्करायसमुद्रम मंदिरातील ही घटना केवळ पोलिस तपासापुरती मर्यादित राहिली नाही, तर समाजात एक वेगळा संदेश देऊन गेली आहे. चोरी करून सुख मिळत नाही, उलट त्यातून संकटं आणि वेदना वाढतात, हे यामुळे अधोरेखित झाले. त्यामुळे ही घटना अपराधापेक्षा पश्चात्ताप आणि श्रद्धेच्या शक्तीची जाणीव करून देणारी ठरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

तुम्ही आमचे बातमी कॉपी नाही करू शकत  या वृत्तपत्राचे सर्व अधिकार राखीव आहेत.